01 January, 2014

आयुष्य

आयुष्य फक्त एकदाच मिळतं. दुसरा क्षण येतो तेव्हा पहिला क्षण निघून जातो, तो क्षण कसा जगायचा हे आपल्या हातात असतं. येणारा क्षण हा जातोच,  मग तो दुखःत घालवा किवा आनंदात.
प्रत्येक क्षण हि एक संधी असते आणी प्रत्येक संधीत असते एक आशा, स्वप्न पूर्ण करण्याची. प्रत्येक चांगला- वाईट क्षण मिळून माळ बनत असते आणी ती माळ म्हणजेच जीवन. जे क्षण आनंदाने जगलेले असतात ते मोती बनतात आणी इतर बनतात दगड पण मोत्यांचा अहंकार बाळगायचा नसतो आणी दगडांचा तिरस्कार करायचा नसतो. जिथे मोती उपयोगी पडत नाही तिथे दगड उपयोगी येतो. दुखःने घालविलेल्या क्षणाचा उपयोग  सुख वेचण्यासाठी करायचा असतो आणी सुखः - दुखःचा समतोल साधत जीवन जगायचे असते.


- अनिकेत भांदककर.

No comments:

Post a Comment